सातारा – राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार फोफावला आहे. मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांची चौकशी करुन त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी सातारा येथील पोवईनाका येथे भारतीय जनता पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन करुन सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. शेतकरी आत्महत्या, महिलांवरील वाढते अत्याचार, एम.पी.एस.सी. परीक्षेचे ढिसाळ नियोजन, मनसुख हिरेन खूनप्रकरण आदी मुद्यांबाबतही यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी आणि तालुकाध्यक्ष राजेंद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पोवई नाका येथे राज्य सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा निषेध करण्यात आला.
“अब तो ये स्पष्ट है, ये सरकार भ्रष्ट है’, महाविकास आघाडीचा धिक्कार असो, गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, मुख्यमंत्री ठाकरे राजीनामा द्या आदी घोषणांचे फलक कार्यकर्त्यांनी हातात धरले होते. या आंदोलनात महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुवर्णाताई पाटील, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, अमोल सणस, विक्रांत भोसले, जयदीप ठुसे, गणेश पालखे, सुनील जाधव, चंदन घोडके, प्रशांत जोशी, मनीषाताई पांडे, रवी आपटे, विक्रम बोराटे, रीना भणगे, मोनाली पवार, सुनिता शहा, संदीप वायदंडे, विक्रम पवार, सचिन साळुंखे, विवेक कदम, अली आगा, गीता लोखंडे, वनिता पवार, कुंजा खंदारे, अमोल टंगसाळे, सुनील काळेकर, अमोल कांबळे, विक्रम अवघडे, महेंद्र कदम, मनीष महाडवाले, हेमांगी जोशी, सुरेखा धोत्रे, जयश्री निकम, जगन्नाथ गावडे, श्रीकांत शिंदे, प्रमोद साळुंखे, आनंदा घोरपडे, रोहित साने, दिपिका झाड, दीपक क्षीरसागर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.