कोल्हापूर – अमित शहा यांनी महाविकासआघाडी विरोधात केलेले वक्तव्य हे अयोग्य आहे. महाविकासआघाडी ही पवित्र असून लोकांच्या कल्याणासाठी सत्तेवर ती आली असल्याच प्रतिउत्तर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा दिल आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. दरम्यान अमित शहा यांचा महा विकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितलं आहे
यावेळी बोलताना मुश्रीफ म्हणाले मुख्यमंत्री म्हणून राज्याची सर्व जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजप नेते अमित शहा यांच्यामध्ये सरकार स्थापन होण्यापूर्वी बंद दरवाज्या आड नेमक्या काय चर्चा झाले आहेत हे अनेक वेळा उघड झालं आहे. त्यामुळे अमित शहा यांनी चुकीच्या पद्धतीने बोलू नये असं सांगत पहिल्या कोरोणाच्या लाटेतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगलं उत्कृष्ट आणि संयमी काम केलं आहे आणि आताही ते चांगलं काम करत असल्याचा मुश्रीफ यांनी म्हटले आहे.