अहमदाबाद, दि. 27 – गुजरातमध्ये करोनाची स्थिती अत्यंत गंभीर पातळीवर गेली असल्याने आपल्या राज्यातही त्वरित लॉकडाऊन सुरू करा, अशी मागणी गुजरातमधील दोन भाजप आमदारांनी सरकारकडे केली आहे. केतन इनामदार आणि शैलेश मेहता अशी या दोन आमदारांची नावे आहेत.
इनामदार यांनी पत्रकारांना सांगितले की गुजरातमधील स्थिती आणखी गंभीर होंण्याच्या आतच राज्यात लॉकडाऊन लागू करण्याची गरज आहे. करोना असतानाही राज्यात मोठ्या प्रमाणात विवाह सोहळे आयोजित केले जात आहेत ही गंभीर बाब आहे, असे ते म्हणाले.
ग्रामीण भागात अजूनही करोनाविषयीची जाणीव अत्यंत कमी आहे. तेथे कसलेच निर्बंध पाळले जात नाहीत बडोदा जिल्ह्यातील 164 रुग्णालयांना ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना दाखलच करून घेण्यास मनाई केली आहे. त्याबद्दल त्यांनी जिल्हा प्रशासनाचा निषेध केला. बडोदा जिल्ह्यात ऑक्सिजनची मागणी वाढत असून त्या जिल्ह्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणीही या दोन आमदारांनी केली आहे.