नवी दिल्ली – धुलीकणांमुळे आण्विक शस्त्रास्त्रांचा प्रभाव कमी करता येतो, हा निष्कर्श एका वैज्ञानिक महिलेने प्रयोगाअंती लावला आहे. एका वर्षाच्या अवकाशानंतर विज्ञान विश्वात परतणाऱ्या डॉ. मीरा चढ्ढा या एका वैज्ञानिक महिलेने हा प्रयोग करून दाखवला आहे.
आण्विक शस्त्रास्त्राचा मानवावर होणारा जीवघेणा परिणाम धुलीकणांच्या मदतीने अंशतः कमी करता येतो, किंवा दूरही करता येतो, हे नवी दिल्लीतल्या, नेताजी सुभाष तंत्रज्ञान संस्थेतील डॉ. मीरा च-ा यांनी पहिल्यांदाच आपल्या गणितीय सूत्रांच्या अभ्यासातून हे सिध्द करुन दाखवले. त्यांनी अलीकडेच केलेला याविषयीचा अध्ययन प्रबंध- “प्रोसिडिंग्ज ऑफ रॉयल सोसायटी, लंडन’ यात प्रसिद्ध झाला असून, या संशोधन प्रबंधात धूलीकणांच्या मदतीने, आण्विक स्फोटातून निघणाऱ्या किरणोत्सारी उर्जेचा परिणाम कसा कमी करता येईल, याविषयी माहिती देण्यात आली आहे. त्यांनी या प्रबंधात हे दाखवून दिले आहे, की या स्फोटातून निघणाऱ्या लहरींचा प्रभाव कसा कमी करता येऊ शकतो.
आपल्या पीएचडी अभ्यासादरम्यान, मी शॉक वेव्ह म्हणजे विद्युत लहरींचा आणि त्यांची शक्ती कमी करण्यात धुलीकणांचा कसा वापर केला जाऊ शकतो, याचा अभ्यास केला होता. दरम्यान, मी आपले माझी राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचे “सायन्स टूवर्डस स्पिरीच्युएलिटी हे पुस्तक वाचले.
यात त्यांनी प्रश्न विचारला आहे की, आपण विज्ञानाच्या मदतीने असा थंड बॉम्ब तयार करु शकतो का, जो जीवघेण्या अणुबॉम्बचा प्रभाव नष्ट करु शकेल? या वाक्यानेच मी हे संशोधन करण्यास प्रेरित झाले, असे डॉ चा यांनी सांगितले.