नवी दिल्ली – गेल्या 24 तासांत देशातील 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये करोनाचा एकहीं बळी नोंदवला गेलेला नाही अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्रालयाच्यावतीने आज देण्यात आली.
या 17 राज्यांमध्ये तेलंगणा, ओडिशा, झारखंड, पदुच्चेरी, चंदीगड, नागालॅंड, आसाम, मणिपुर, सिक्कीम, मेघालय, लडाख, मिझोराम, अंदमान आणि निकोबार, त्रिपुरा, लक्ष्यद्विप, अरूणाचल प्रदेश, आणि दादरा नगरहवेली, तसेच दमण आणि दीव यांचा समावेश आहे.
उर्वरीत तेरा राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये करोना बळींची संख्या 1 ते 5 इतकीच आहे. दरम्यान आज अखेर पर्यंत देशातील 80 लाख लोकांना करोना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.
दरम्यान गेल्या 24 तासांत देशभरात 12 हजार 143 नवीन करोना बाधित आढळून आले आहेत. यातील बहुतांशी म्हणजे 86.01 टक्के केसेस सहा राज्यांतील आहेत. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात करोनामुळे 36 लोक दगावले असून केरळातील मृतांची संख्या 18 इतकी आहे.