जयपूर – सचिन पायलट यांना मुख्यमंत्री केले नाही तर राजस्थानात राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अडवली जाईल असा इशारा गुर्जर समाजाचे नेते विजयसिं बैंसला यांनी दिला होता. त्यांच्या या वक्तव्यापासून कॉंग्रेस नेते सचिन पायलट यांनी स्वताला दूर ठेवले आहे. त्यांनी म्हटले आहे की राहुल गांधींची राजस्थानातील यात्रा यशस्वीपणे पार पडेल. या यात्रेत विघ्न आणण्याचे काम भाजपचेच लोक करीत आहेत असे त्यांनी म्हटले आहे.
बैंसला यांच्या धमकीबद्दल विचारले असता पायलट म्हणाले की भाजपने कितीही प्रयत्न केले तरी ही यात्रा यशस्वी होईल. या यात्रेत भाजप गडबड करण्याचा प्रयत्न करू शकतो. पण यात्रा ही ‘भारत जोडो यात्रा’ आहे आणि ती यशस्वी होईल. राज्यात यात्रेचे आम्ही सर्वजण एकजुटीने स्वागत करू, असे त्यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. डिसेंबरच्या पहिल्या अधिवेशनात ही यात्रा राजस्थानात येणार आहे.