नवी दिल्ली – कॉंग्रेसच्या संघटनात्मक बाबींसाठी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना सल्ला देण्यासाठी एक सल्लागार समिती स्थापन करण्यात आली असून या समितीची पहिलीच बैठक काल मंगळवारी झाली. त्यात पक्षाच्या सद्यस्थितीवर चर्चा करण्यात आली.
सोनिया गांधी यांनीच ऑगस्ट महिन्यात ही समिती स्थापन केली होती. त्यात सहा जणांचा समावेश करण्यात आला आहे. बिहार मध्ये पक्षाचा जो पराभव झाला त्यावरून कॉंग्रेस नेतृत्व अजून गप्प कसे असा सवाल पक्षाचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी व्यक्त केला होता. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली.
तथापि या बैठकीत नेमकी कशावर चर्चा झाली याची माहिती देण्यात आलेली नाही. तथापि बैठकीत बिहार निवडणूकीचा निकाल आणि जम्मू काश्मीरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संबंधात घ्यायचा निर्णय यावर चर्चा झाली.
बैठकीला ए. के ऍन्टोनी, रणदीप सुर्जेवाला, मुकुल वासनिक आदि नेते उपस्थित होते. अहमद पटेल हेही या समितीचे सदस्य आहेत. पण ते आजारी असल्याने बैठकीला उपस्थित राहुू शकले नाहीत.