मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रात्री 8 वाजता फेसबूक लाईव्हद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला कोरोनासंबंधीत सुरक्षेच्या उपायांचे पालन करणे गरजेचे असल्याचा संदेश दिला.
यावेळी त्यांनी मांडलेले महत्वाचे मुद्दे
– त्रिसुत्री – मास्क घाला, अंतर पाळी, हात धुवा.
– साडेबारा कोटी जनतेला 25 कोटी लस द्याव्या लागणार,
– लस आलेली नाही तोपर्यंत काळजी घ्या
– गर्दी झाली तर कोरोना वाढणार आहे.
– दुसरी लाट नाही त्सुनामी येईल असी भिती वाटते.
– मंदीरात गर्दी करू नका.
– अनेक लोक विनामास्क फिरत आहेत.
– पोस्ट कोविडचे दुष्परीणाम भयंकर.
– महाराष्ट्राच्या आरोग्याचा नकाशा तयार करायचा आहे.
– कोरोना होऊन गेल्यानंतर त्याचे साईड ईफेक्ट दिसत आहे.