नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयामार्फत 25 ऑगस्ट रोजी देशातील 100 स्मार्ट सिटींसाठी विविध गटात महाराष्ट्रातून कल्याण-डोंबिवली आणि औरंगाबाद शहरांनी बाजी मारली आहे.
“कोविड-इन्होवेशन स्मार्ट सिटी ऍवार्ड स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेच्या दुस-या टप्प्यातील एकुण 40 शहरांमधून कोविड इन्होवेशन अवॉर्डसाठी फक्त वाराणसी, कल्याण-डोंबिवली, वडोदरा, आग्रा या 4 शहरांची निवड झाली होती. यापैकी गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाचे राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज शुक्रवारी वाराणसी आणि कल्याण डोंबिवली यांना संयुक्तपणे विजेते घोषित केले आहे.
तसेच स्मार्ट सिटीज मिशनद्वारे औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या स्मार्ट सिटीबसने अर्बन मोबिलिटीमध्ये देशात प्रथम क्रमांक पटकवला आहे. औरंगाबादची सिटीबस देशात स्मार्ट ठरली आहे. शिवसेनेचे माजी महापौर नंदकुमार घोडेले, तत्कालीन मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्यासह मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्या परिश्रमाचे हे यश आहे.