दिल्ली – करोनाची लस देताना सामान्य आणि व्हीआयपी असा भेदभाव केला जाऊ नये, असे मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविद केजरीवाल यांनी मांडले आहे. केजरीवाल म्हणाले की सर्वांचाच जीव महत्त्वाचा आहे, त्यामुळे करोनाची लस देताना सामान्य आणि व्हीआयपी असा भेदभाव केला जाऊ नये.
लस देताना करोना योद्ध्यांना प्राधान्य द्यायला हवे. त्यांच्यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि शारीरिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना प्राधान्य द्यायला हवे. केजरीवाल म्हणाले की, करोनावरील लशीचं वितरण करण्यासाठी केंद्र सरकारकडून योजना तयार केली जाण्याची शक्यता आहे.
दिल्ली सरकार मात्र राजकीय विचार न करता तांत्रिकदृष्ट्या आणि प्राथमिकतेच्या आधारावर कोरोनावरील लशीचं वितरण करण्यास प्राधान्य देईल.