मुंबई – दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भात शालेय शिक्षण मंत्रालयाने मोठी घोषणा केली आहे. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12 वी परीक्षा आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र 10वीची परीक्षा एप्रिल-मे 2021 मध्ये अनुक्रमे 23 एप्रिल 2021 ते 21 मे 2021 आणि 29 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
10 वी परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 या कालावधीत होणार
10 वीची परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 या कालावधीत होणार आहे. तर 12 वीची परीक्षा 23 एप्रिल 2021 ते 201 मे 2021 या कालावधीत होणार आहे. तसेच महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरही 16 फेब्रुवारी 2021 पासून वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करता यावे, यासाठी एप्रिल – मे 2021 च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.