नवी दिल्ली – भारताच्या महिला फुटबॉल संघाची स्ट्रायकर बालादेवी हिच्याकडून देशातील नवोदितांनी प्रेरणा घ्यायला हवी. तिने इंग्लंडमधील रेंजर्स क्लबशी करार करत तेथील स्पर्धांमध्ये सहभाग घेतल्यानेच तिचा खेळ उंचावला व आज देशाला त्याचा लाभ होताना दिसत आहे, हेच नवोदितांनी केले तरच भारतीय फुटबॉलचा स्तर उंचावेल, असे मत भारताच्या महिला फुटबॉल संघाची अव्वल गोलकिपर अदिती चौहान हिने व्यक्त केले आहे.
बालादेवीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही डगमगून न जाता आपली गुणवत्ता सिद्ध केली म्हणूनच तिला इंग्लंडमधील प्रसिद्ध रेंजर्स फुटबॉल क्लबने करारबद्ध केले. तिच्याच पावलावर पाऊल ठेवत नवोदितांनी मेहनत केली तर त्यांनाही आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजले जाईल. सध्या करोनामुळे सराव व स्पर्धा ठप्प झालेल्या आसल्या तरीही येत्या काळात भारतीय महिला फुटबॉलचा स्तर उंचावण्यासाठी बालादेवीच्या वारसदार झाल्या पाहिजेत, असेही अदिती म्हणाली.
फुटबॉल खेळायला सुरुवात केली तेव्हापासून मला बालादेवीच्या खेळाने प्ररेणा मिळाली. आपणही तिच्यासारखेच देशाकडून तसेच परदेशातील विविध स्पर्धांमध्ये तेथील क्लब संघाकडून खेळावे अशी इच्छा होती ती गेल्या वर्षी पूर्ण झाली. देशात अनेक शहरांमध्ये फुटबॉल शिबिरे होतात, त्यात अनेक मुली सहभागी होतात. याच मुलींनी बालादेवीचा आदर्श ठेवला पाहिजे.