नवी दिल्ली – नवे सरकार दूरसंचार क्षेत्रातील सुधारणा नेटाने पुढे नेईल. 5जी सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या नवे सरकार वेगात देईल अशी आशा दूरसंचार नियामक अधिकारीचे अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी व्यक्त केलेली आहे.
विकसित देशात 5जी तंत्रज्ञानावर भर देण्यात येत आहे. भारताने डिजिटल इंडिया मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे भारताला विकसित देशांबरोबरच 5जी सेवा सुरू कराव्या लागणार आहेत. त्यासाठी हे सरकार स्पेक्ट्रम लिलाव सुरू करण्यास प्राधान्य क्रम देईल अशी आशा व्यक्त केली. पहिल्या शंभर दिवसांसाठी दूरसंचार विभागाने आपला कार्यक्रम तयार केलेला आहे. दूरसंचार मंत्रालयाला हा शंभर दिवसांचा कार्यक्रम सादर करण्यात येईल.