औरंगाबाद: राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यातच मराठवाड्यात कोरोनासोबत आणखी एक संकट समोर उभे राहिले आहे. मागील काही दिवसांपासून औरंगाबादमध्ये सारीच्या आजाराने थैमान घातले आहे. मागच्या अकरा दिवसामध्ये याठिकाणी १० जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कोरोनाबाधितांची संख्या औरंगाबादेत चिंतेचा विषय ठरत असतानाच सारीचे (सिव्हीअरली अॅक्युट रेस्पिरेटरी इलनेस) संकट, शहरातील सारीच्या 23 रूग्णांवर घाटीरुग्णालयामध्ये उपचार सुरू, सारीच्या रूग्णांमध्ये कोरोनासारखीच लक्षणे, रूग्णाला सर्दी, ताप, खोकला येतो. त्याला श्वास घ्यायला त्रास होतो.
हे एक प्रकारचे इन्फेक्शन असते. ते विषाणूंमुळे किंवा साथीमुळे अशा दोन्ही प्रकारचे असू शकते. तर कोरोनाचे इन्फेक्शन हे केवळ साथीच्या स्वरूपाचे आहे. त्यामुळे सारीचा रूग्ण हा कोरोनाही असू शकतो.ही शक्यता विचारात घेऊन सारीच्या सर्व रूग्णांचे स्वॅब तपासण्यात येत आहे.