मुंबई : मुंबईत मंगळवारी नवे 355 करोनाबाधित आढळले. त्यामुळे त्या महानगरातील रूग्णांची संख्या 3 हजार 445 वर पोहचली आहे. देशातील सर्वांधिक करोनाबळींची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. एकट्या मुंबईत आतापर्यंत 150 जण दगावले आहेत. मुंबईतील 408 रूग्ण करोनामुक्त ठरल्याची बाब दिलासादायक मानली जात आहे.
त्या महानगराच्या धारावी परिसरातील करोनाबाधितांची वाढती संख्या चिंताजनक ठरत आहे. धारावीत नवे 12 रूग्ण आढळले. त्यामुळे त्या परिसरातील करोनाबाधितांची संख्या 180 इतकी झाली आहे. धारावीत आतापर्यंत करोनाने 12 रूग्णांचा बळी घेतला आहे.