सर्वसामान्यांच्या वाईट काळात त्यांच्यासोबत राहणं हे राजकारण असू शकत का?
बीड: एकीकडे सध्याचे नेते मंत्रालयात बसून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत आहेत तर दूसरीकडे आदरणीय साहेब या वयात शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांच्या समस्या समजून घेत आहेत. आघाडी शासनाच्या काळात दुष्काळा असो किंवा अन्य कोणतिही नैसर्गिक आपत्ती असो शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याच काम कधीच झालं नसल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
सध्या महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती आहे. यावर राजकारण देखील पाहायला मिळत आहे. दुष्काळावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार त्यांच्यासोबत दुष्काळी दौऱ्यावर असेलेले रोहित पवार यांनी भाजपवर फेसबुक पोस्टव्दारे निशाणा साधला आहे.
रोहित पवार म्हणाले,लोकसभेच्या निवडणुका होताच साहेब दुष्काळी भागाचे दौरे करु लागले. प्रत्यक्ष भेटून शेतकरी, युवक, शेतमजूर, कामगार यांच्यासोबत चर्चा करू लागले. अशा वेळी विरोध करायचा म्हणून सत्ताधाऱ्यांकडून साहेबांवर टिका करण्यात आली. सर्वसामान्यांच्या वाईट काळात त्यांच्यासोबत राहणं हे राजकारण असू शकत का?
शरद पवार यांनी दुष्काळी दौऱ्यात सहभागी होवून फक्त समस्या समजून घेतल्या नाहीत तर त्यावर असणाऱ्या उपाययोजन, शासकिय पातळ्यांवर कोणत्या निर्णयांची आवश्यकता आहे असे अनेक विषय समजून घेण्यात आले. संपुर्ण परिस्थिती पाहून दुष्काळावर तातडीची मदत म्हणून माण तालुक्यामध्ये माझ्या कंपनीमार्फत ३० पाण्याच्या टँकरची सोय देखील करण्यात आली.