पुणे – – महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात लव्ह जिहादवर बंदी यावी, धर्मांतर बंद व्हायला हवं, लव्ह जिहादवर कायदा करा, अशी मागणी तेलंगणाचे आमदार राजा भैय्या यांनी केलं. पुण्यात आज हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्राच्या राज्य सरकारला आवाहन करतो की, त्यांनी याबाबत गंभीर विचार करायला हवा. आज मोठ्या संख्येने बांगलादेशी महाराष्ट्रात घुसत आहे. यासाठी मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन करतो की, यावर काही केलं नाही तर आगामी काळात भयानक परिणाम दिसतील, असंही राजा भैय्या म्हणाले आहे.
रम्यान धर्मवीर संभाजी महाराज यांच्यावर राजकारण करू नका. त्यासाठी दुसरे विषय आहेत. तसेच एखादा मंत्री संभाजी महाराज यांच्यावरून राजकारण करत असेल तर त्यांच्यावर बहिष्कार टाका, अस आवाहनही राजाभैय्या यांनी उपस्थितांना केलं.
पहा व्हिडिओ