सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी बडे प्रस्थ असलेल्यांवर टीकेची झोड उठवली आहे. गटबाजीच्या राजकारणानेच सुशांतचा बळी घेतला आहे, असे अनेकजण मानत आहेत. करण जोहर, सलमान खान, एकता कपूरसह अनेकांच्याविरोधात एक केसपण दाखल झाली आहे. त्याचवेळी इंटरनेटवर अनेक सेलिब्रिटीज निगेटिव्ह पोस्ट व्हायला लागल्यामुळे सोशल मिडीयापासूनच दूर जाऊ लागल्या आहेत. नेहा कक्कडने सोशल मीडिया सोडून दिल्याचे घोषित करून टाकले आहे.
मी आता झोपते आहे. जेंव्हा जग चांगले होईल, तेंव्हा मला उठवा, असे तिने इन्स्टाग्रामवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. एक असे जग जिथे स्वातंत्र्य, प्रेम, सन्मान, एकमेकांची काळजी, आनंद आणि चांगले लोक असतील. जिथे केवळ तिरस्कार, वशिलेबाजी, पूर्वग्रह, बॉसगिरी, हिटलर, खुनी, आत्महत्या आणि वाईट लोक आहेत, असे जग नको. गुड नाईट असे तिने म्हटले आहे. एवढेच नव्हे तर मी मरणार नाही. केवळ काही दिवसांसाठी जाते आहे, असेही नेहाने म्हटले आहे.
आपल्या पोस्टने कोणाला वाईट वाटले असेल, तर आपण माफी मागत असल्याचेही तिने म्हटले आहे. पण खूप काळापासून आपल्या भावना व्यक्तच करता येत नव्हत्या, असेही नेहा या पोस्टमध्ये म्हणाली आहे.