पुणे- परराज्यांतील मजुरांना पुन्हा त्यांच्या मूळगावी पाठवण्यात केंद्र आणि राज्य सरकार यांचा हलगर्जीपणा झाला आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. या पुढील काळातही करोनाचा वाढता धोका लक्षात घेऊनच सार्वजनिक आरोग्य सेवेला बळकटी आणावी लागेल, असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने चव्हाण यांची शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकार परिषद पार पडली. करोना स्थिती, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या पॅकेज, पुढील उपाययोजनांसदर्भात चव्हाण यांनी मत मांडले.
केंद्र सरकारने सर्व राज्यांत असलेल्या मजुरांना त्यांच्या मूळगावी जाण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी आर्थिक तरतूद राज्यांना उपलब्ध करून दिली आहे. असे असतानाही अनेक मजूर पायी आपल्या गावी निघाले आहेत. याविषयी चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. या मजुरांना गावी पाठवण्यासाठी रेल्वे, एसटी बसेस उपलब्ध करून द्याव्यात. त्यासाठी पैसा खर्च करण्यात कंजुषी दाखवू नये. हा मजूरच महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, तो पुन्हा परतला नाही तर महाराष्ट्राला यांत्रिकीकरणावर भर द्यावा लागेल, असे चव्हाण म्हणाले.
चव्हाण म्हणाले, “आत्मनिर्भरता’ हा “जुमला’
केंद्र सरकारच्या पॅकेजमध्ये अनेक त्रुटी
देशातील उत्पादन वाढीला प्रोत्साहन देतानाच ग्राहकही मिळणे आवश्यक
खरेदीची क्षमता वाढवणे गरजेचे
विविध क्षेत्रांसाठीच्या पॅकेजमध्ये त्रुटी आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणात नेहमी “जुमला’ असतो. यावेळी “आत्मनिर्भरता’ हा “जुमला’ त्यांनी आणला आहे.