मुंबई – राज्यात असलेले असंघटित कामगार पुन्हा आपल्या मूळ गावी परत जाण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे राज्य सरकारने आर्थिक मदत आणि अन्नछत्र या माध्यमातून या कामगारांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी केली आहे.
निलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे. या निवेदनात निलम गोऱ्हे यांनी अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे. अनेक स्थलांतरित कुटुंबे ही कामाच्या ठिकाणी घर भाड्याने घेऊन राहतात. वाढत्या करोना रुग्णांमुळे शासनाने आणलेले अंशत:निर्बंध हे कष्टकरी मजुरांचा रोजगाराच्या संधी कमी करणारे आहे. त्यामुळे त्यांना घरभाडे भरणे शक्य होणार नाही.
नैसर्गिक आपत्तीमध्ये शासन सानुग्रह अनुदान प्रत्येक व्यक्तीस रु.1000 व कुटुंबास रु 5000 मर्यादेत देत असते. ही पण नैसर्गिक आपत्तीच असल्याने अशा असंघटित कामगारांना प्रत्येक व्यक्तीस रु 1000 कुटुंबास रु.5000 मर्यादेत शासनाने त्यांचे बॅंक खात्यात द्यावयास हवेत असे माझे मत असल्याचे निलम गोऱ्हे यांनी निवेदनात म्हटले आहे.