अनुराधा पवारव्याप काय थोडे असतात का? त्यामुळे तो आल्याने फार बरे वाटले. तो आला की एखादी तरी स्मितरेषा उमटवून जातो सर्वांच्या चेहऱ्यावर. कोणाच्याही मदतीला तो सदैव तत्पर असतो. थोडी नवलाईची गोष्ट म्हणजे त्याने हाती घेतलेले काम झाले नाही असे सहसा होत नाही. त्याचा जनसंपर्क मोठा आहे. विशेषत: समाज संपर्क. नातेवाईकांची-नात्यांची माहिती त्याच्याइतकी कोणालाही नाही.
काल काका माझ्याकडे आला होता. तसा तो अधून मधून येतोच. बरे वाटते. हल्ली कोणाला कोणाकडे जायला वेळ नसतो. म्हणजे काही काम असले तर असतो, पण सहजपणे आठवण आली म्हणून आपुलकीने भेटायला यायला नसतो वेळ. काम असले तर अर्ध्या रात्री येऊन टपकतील. एरव्ही शेजारून गेले तर बघून न बघितल्यासारखे करून जातील. असो! हा सारा काळाचा महिमा म्हणायचा.
त्या दिवशी मी जरा टेन्शनमध्ये होते. घरात आताच्या पिढीला तर काका-काकी, मामामामी शिवाय नातेवाईकांची माहितीच नसते. आणि हे काकाकाकी-मामामामीही कामापुरतेच. जिव्हाळा हा शब्द शब्दकोशात असला तरी जीवनातून मात्र हरवला आहे. फार दुर्मीळ झाला आहे. लग्ने जमवण्यात तर त्याचा अगदी हातखंडा आहे. कोठे कोणते स्थळ आहे, याची त्याला खडान्खडा माहिती असते. अगदी लग्न न जमणाऱ्या-कडक मंगळ असणाऱ्या मुलामुलींची लग्नेही त्याने जमवून दिली आहेत. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने जमवून दिलेल्या मुलामुलींचे संसार अगदी दृष्ट लागावी अशा सुखासमाधानाचे चालले आहेत. कोठे काही कुरबुर झाली, किंवा चालली आहे याची कुणकुण लागली की तो तेथे जाऊन सारे काही सुरळीत करून देतो. अगदी सहजपणे. काका नेहमी तीन शब्दांचे महत्त्व सांगतात.
जमणे, जमवणे आणि जमवून घेणे. या तीन शब्दांत सारे सुख सामावलेले आहे असे ते सांगत. जमणे म्हणजे एखादी गोष्ट अगदी सहजपणे घडून येणे. त्याला काही फारसे कष्ट पडत नाहीत. पण जमले आहे, किंवा जमत आहे हे समजण्याची अक्कल पाहिजे. तव्यावरची पोळी किती भाजली आहे हे समजायले लागते ना, तसे. ती कच्चीही राहता कामा नये आणि करपताही कामा नये. कशी अगदी योग्य प्रमाणात भाजली गेली पाहिजे. मैफल जमली म्हणतात ना, तशी आयुष्याची मैफलही जमावी लागते, तर जगण्याला मजा येते असे ते सांगतात.
काका नेहमी एक वाक्य सांगतात. कोणत्यातरी साधना केंद्राच्या प्रार्थनेतील वाक्य आहे म्हणे ते- “जमवून घेण्याची शक्ती उपजो!’ माणसाला बाकी सगळं जमतं. पण समोरच्याशी-मग तो कोणीही असो, घरचा-अगदी साता जन्माचा सोबती असो वा दारचा क्षणभराचा सोबती असो; वा आलेली परिस्थिती असो….त्याच्याशी जमवून घेणे जमले नाही, तर मग सारं बिघडतं आणि मुख्य म्हणजे मनाचं समाधान हरवतं. आणि समाधान हरवले की आयुष्यातला राम’च गेला. नुसती फरफट राहिली. नाइलाजास्तव चाललेली.
जीवनात प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते. मनासारखे झाले की आनंद आणि मनाविरुद्ध झाले की दु:ख ही माणसाची स्वाभाविकता आहे. जमवून घेणे अवघड असले तरी अशक्य नसते. कजाग बायको, खट्याळ सून, मूर्ख सहकारी, त्रास देणारा साहेब… आणि पैशांच्या अडचणी अशा समस्यांमध्ये जमवून घेण्याला पर्याय नसतो. नाही तर आगीतून फुफाट्यात अशी स्थिती होऊ शकते. हे सारे ऐकल्यावर माझ्या मनात प्रश्न उभा राहिला.
आता काकाने हे आजच्या राजकारणाच्या संदर्भात तर सांगितले नाही ना?