नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी केंद्रातील विद्यमान एनडीए सरकारवर निशाणा साधला. करोनाच्या काळात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झालेले लोकांचे मृत्यू, शेतकरी आंदोलनादरम्यान झालेले शेतकऱ्यांचे मृत्यू, करोनाच्या काळात परप्रांतीयांचे मृत्यू, मॉब लिंचिंग आणि पत्रकारांच्या अटकेसाठी केंद्र सरकारला जबाबदार धरले, सरकारकडे कोणतीही आकडेवारी नाही, मग अशा घटना घडल्याच नाहीत त्यामुळे लोकांनी यावर जनतेने विश्वास ठेवावा, अशी सरकारची इच्छा असल्याचे राहुल गांधी यांनी यावेळी म्हटले. तसेच त्यांनी सर्वकाही गायब आहे, असे त्यांनी म्हणत केंद्रावर निशाणा साधला आहे.
‘No Data Available’ (NDA) govt wants you to believe:
• No one died of oxygen shortage
• No farmer died protesting
• No migrant died walking
• No one was mob lynched
• No journalist has been arrestedNo Data. No Answers. No Accountabilty. pic.twitter.com/mtbNkkBoXe
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 23, 2022
याआधी शुक्रवारी राहुल गांधी यांनी ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यात सवलत न दिल्याबद्दल केंद्र सरकारवर टीका करत, 8400 कोटी रुपयांचे विमान खरेदी करण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत, पण रेल्वे भाड्यात वृद्धांना सवलत देण्यासाठी 1500 कोटी रुपये नाहीत असे म्हटले आहे.
तसेच त्यांनी ट्विट केले की, “जाहिरातींची किंमत: रु. 911 कोटी, नवीन विमान: रु. 8,400 कोटी, बुर्जुआ मित्रांसाठी कर सवलत: वार्षिक रु. 1,45,000 कोटी, पण सरकार 1500 कोटी वृद्धांना रेल्वे तिकिटांवर सवलत देणार नाही.