मुंबई – महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. उद्या बहुमत चाचणी घ्यावी असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्याचबरोबर पाच वाजेपर्यंत आमदारांचे शपथविधी पूर्ण करा आणि
या संपूर्ण प्रक्रियेचे लाइव्ह टेलिकास्ट करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय भारतीय लोकशाहीतील मैलाचा दगड ठरला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.
Nawab Malik, NCP on ‘SC orders Floor Test in Maharashtra Assembly on Nov 27’: Today’s verdict of the SC is a milestone in Indian democracy. Before 5 pm tomorrow, it will be clear that BJP’s game is over. In a few days, there will a govt of Shiv Sena-NCP-Congress in Maharashtra. pic.twitter.com/dTaw83RwqT
— ANI (@ANI) November 26, 2019
नवाब मलिक म्हणाले की “सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेला निकाल हा भारतीय लोकशाहीतील मैलाचा दगड ठरला आहे. उद्या सायंकाळी पाच वाजेच्या अगोदर भाजपचा खेळ संपला असल्याचे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर काही दिवसातच राज्यात शिवसेना -राष्ट्रवादी -काँग्रेसचे सरकार येईल.” असे आमदार नवाब मलिक यांनी म्हटले आहे.