मुंबई – 8 डिसेंबर रोजी होणाऱ्या भारत बंदला महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबतची घोषणा केली आहे. तसेच, राष्ट्रवादीच्या ट्विटर आणि फेसबूकच्या अधिकृत अकाऊंटवर याबाबतची पोस्टही प्रसिध्द करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने चर्चेविना नवा कृषी कायदा अंमलात आणत शेतकऱ्यांना जाचक असणाऱ्या तरतुदी लादल्या आहेत. शेतकरी संघटनांशी याबाबत केंद्र सरकारच्या झालेल्या चर्चेच्या फेऱ्या अपयशी ठरल्या. त्यामुळे या कायद्याविरोधात शेतकरी आंदोलनाची धार तीव्र करण्यासाठी देशभरातील शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबर रोजी राष्ट्रव्यापी ‘भारत बंद’ पुकारला आहे. या ‘भारत बंद’ला महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे समर्थन देत आहे, अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.
केंद्र सरकारने चर्चेविना अंमलात आणलेल्या जाचक कृषी कायद्याविरोधात तीव्र आंदोलनासाठी शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबर रोजी राष्ट्रव्यापी ‘भारत बंद’ पुकारला आहे. या ‘भारत बंद’ला महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे समर्थन देत आहे.
– @Jayant_R_Patil#IStandWithFarmers— NCP (@NCPspeaks) December 6, 2020
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी शांतपणे व कोविडकाळातील मर्यादांचे पालन करून या ‘भारत बंद’मध्ये सहभागी व्हावे व या कायद्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करावा, असे आवाहन देखील महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून यावेळी करण्यात आले आहे.