मुंबई : हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी रवाना झालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. तिथे त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकारानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विटरद्वारे निषेध व्यक्त करत भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे.
जंयत पाटील यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते राहुल गांधी यांना यूपी पोलीसांनी दिलेली वागणूक ही अत्यंत निंदनीय आहे. आम्ही या घटनेचा निषेध करतो.
पुढे भाजपवर टीका करताना ते म्हणतात, प्रभू श्रीरामाचे नाव मुखी ठेवून कृती नथुरामाची करायची ही भाजपची वृत्ती पुन्हा समोर आली आहे. तसेच दडपशाही करणाऱ्या भाजपने वेळीच आपली धोरणे बदलावी असे देखील जयंत पाटील यांनी म्हटले आहे.