सोलापूर – राजकारणात सभांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये अनेकवेळा नेते मंडळी असं काही तरी बोलून जातात की, त्यानंतर त्यांच्या वक्तव्याचीच चर्चा सर्वत्र सुरु होते. असाच काहीसा प्रकार भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांच्याबाबत घडला आहे. मागील काही दिवसांपासून त्यांनी केलेल्या वक्तव्यांची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) भारतीय जनता पार्टीत अस्वस्थ असून त्या लवकरच पक्षाला सोडचिठ्ठी देतील अशी चर्चा देखील सध्या सुरु आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी याबाबत एक मोठी प्रतिक्रिया दिली आहे. सुळेंच्या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळातील चर्चांना आणखीच उधाण आले आहे.
सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी केंद्राच्या महागाई विषयक धोरणांवर जोरदार टीका केली. त्याचबरोबर पीएफआयवरील केंद्राने घातलेल्या बंदीवरूनही सुळेंनी टीका केली. पत्रकार परिषदेत त्यांना पंकजा मुंडेंच्या ( Pankaja Munde ) भाजप सोडण्यावर आणि राष्ट्रवादीत प्रवेशाबत प्रश्न विचारले असता त्या म्हणाल्या, “प्रत्येकाने आपला निर्णय घ्यावा. जर कोणी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येणार असेल, तर त्यांचे स्वागतच आहे.” असेही सुळे म्हणाल्या.
पंकजा मुंडेंनी ( Pankaja Munde ) काय बोलल्या होत्या?
पंतप्रधान नरेंद्र यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे एका कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी ( Pankaja Munde ) राजकारणातील वंशवादाबाबत वक्तव्य केले होते. “देशात सध्या पंतप्रधान मोदीजी हे राजकारणातील वंशवाद संपवण्याच काम करत आहेत. मी देखील वंशवादाचं प्रतीक आहे. मात्र मला मोदी सुद्धा संपवू शकणार नाहीत. जर मी तुमच्या मनात असेल तर, तेही असे करू शकणार नाहीत.” असे वक्तव्य पंकजा मुंडेंनी केले होते. ( NCP MP Supriya Sule statement on BJP pankaja Munde join NCP )
दरम्यान, केंद्र सरकारने पीएफआय या संघटनेवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. यानंतर देशातील राजकारण चांगलेच तापले. पीएफआयवर जशी बंदी घातली तशीच कारवाई राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देखील करावी अशी मागणी काही जणांकडून केली जात आहे. याबाबत सुप्रिया सुळेंना ( Supriya Sule ) विचारले असता त्या म्हणाल्या की, “जर देशात एखाद्या गोष्टीची मागणी होत असेल तर त्यावर चर्चा व्हायला हवी.”