Supreme Court : राज्यातील सर्वात मोठ्या सत्तासंघर्षयावर आज देशाच्या सर्वोच्च न्यायालयात ( Supreme Court ) सुनावणी सुरु आहे. त्यामुळे आजच्या या महत्वाच्या सुनावणीकडे राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( shinde group ) गटातील आमदारांच्या पात्र-अपात्रतेबाबत निर्णय होण्याची देखील शक्यता आहे. त्याचबरोबर धनुष्यबाण हे चिन्ह नेमके कोणाचे? याबाबतही निर्णय होणे अपेक्षित मानले जात आहे.
त्यामुळे राज्यात सर्वत्र सर्वोच्च न्यायालयाच्या ( Supreme Court ) सुनावणीचीच चर्चा सुरु आहे. शिंदे गटातील आमदार जर अपात्र ठरले तर राज्यातील शिंदे ( Eknath Shinde ) सरकार कोसळणार का? असेही प्रश्न सध्या उपस्थित झाले आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आमोल मिटकरी ( Amol Mitkari ) यांनी एक ट्विट देखील केले आहे. त्यांनी या ट्विटद्वारे शिंदे सरकारला इशाराच दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयात ( Supreme Court ) उद्धव ठाकरे यांच्या बाजूने कपिल सिब्बल तर शिंदे गटाकडून अभिषेक मनू सिंघवी हे बाजू मांडत आहेत. दरम्यान दोन्ही गटांकडून वेगवेगळ्या मागण्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडे ( Supreme Court ) अंतरिम अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये उद्धव ठाकरे गटाचे म्हणणे आहे की, न्यायालयाने आगोदर शिंदे गटातील आमदारांच्या पात्र-अपात्रतेबाबत निर्णय द्यावा. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून निवडणूक चिन्ह म्हणजे धनुष्यबाण कोणाचा? याबात निर्णय द्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. त्यातच आता अमोल मिटकरी ( Amol Mitkari ) यांच्या शिंदे सरकार दसऱ्याअगोदर कोसळणार या इशाऱ्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
शिंदे गटातील १६ आमदारांच्या पात्र-अपात्रतेबाबतचा निर्णय अद्याप सर्वोच्च न्यायालयात ( Supreme Court ) सुरु आहे. त्यामुळे हा निर्णय जर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला आणि शिंदे गटातील त्या आमदारांना अपात्र घोषित करण्यात आले तर राज्यातील सरकार कोसळण्याची शक्यता आहे. आमोल मिटकरी ( Amol Mitkari ) यांनी ट्विटमध्ये म्हटलेय की, “उद्या १६ आमदार अपात्र ठरल्यास हे सरकार दसऱ्यापूर्वीच कोसळेल..न्यायदेवता न्याय देईलच.” मिटकरींच्या या ट्विटमुळे आता राज्यात सरकार कोसळणार असल्याच्या चर्चा वाढल्या आहे.