मुंबई – गर्दी होईल असा एकही राजकीय कार्यक्रम घेण्यास पक्षाच्यावतीने मनाई करण्यात आली असून तसे कार्यक्रम पक्षाच्या माध्यमातून होणार नाहीत, अशी पक्षाची भूमिका असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.
राज्यातील सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम घेऊन गर्दी जमवू नका किंवा एखाद्या कार्यक्रमातून गर्दी होईल असा कार्यक्रम घेऊ नका, थोडे दिवस थांबा, असा आग्रह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (6 सप्टेंबर) कॅबिनेटमध्ये केला.
गर्दी होईल असा एकही राजकीय कार्यक्रम घेण्यास पक्षाच्यावतीने मनाई करण्यात आली असून तसे कार्यक्रम पक्षाच्या माध्यमातून होणार नाहीत, अशी पक्षाची भूमिका असल्याचे @NCPspeaks चे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री ना. नवाब मलिक यांनी सांगितले. @nawabmalikncp #coronavirus pic.twitter.com/mpH6cByXlY
— NCP (@NCPspeaks) September 6, 2021
तशा सूचना तिन्ही पक्षांच्या पदाधिकार्यांना दिल्या गेल्या आहेत. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता गर्दी टाळण्यासाठी पावले टाकली पाहिजेत, हीच पक्षाचीही भूमिका असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.