मुंबई – भाजपने अजित पवार यांना सोबत घेऊन शनिवारी सकाळी महाराष्ट्रात सत्तास्थापन केली. राजभवनात राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. एका बाजूला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आम्ही शिवसेना आणि कॉंग्रेसला सोबत घेऊऩ सरकार स्थापन करू, अस राष्ट्रवादीतर्फे सांगण्यात येत आहे.
अगर फलक को जिद है बिजलियाँ गिराने की,
तो हमें भी जिद है वहीं पर आशियाँ बसाने की …
हम होंगें कामयाब ।@NCPspeaks @MumbaiNCP— Nawab Malik (@nawabmalikncp) November 25, 2019
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज ट्विटरवरुन शेर शेअर केला असून हम होंगे कामयाब! असं सूचक विधान केले आहे. नवाब मलिक ट्विटमध्ये म्हणतात की अगर फलक को जिद है बिजलियाँ गिराने की, तो हमें भी जिद है वहीं पर आशियाँ बसाने की …हम होंगें कामयाब ।
राज्यात शनिवारी अचानक घडलेल्या या शपथविधीमुळे मोठा राजकीय भूकंप झाला. त्यानंतर अजित पवारांनी दिलेलेलं समर्थन हे वैयक्तीक आहे हा राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर रंगलेल्या राजकीय नाट्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबामध्ये फूट पडल्याचे स्पष्ट झालं.