मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बोलणार्या देवेंद्र फडणवीस यांना शरद पवार यांनी यापूर्वी कात्रजचा घाट दाखवला होता आणि आताही बोलत राहिले तर शरद पवार काशीचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस हा साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष असल्याच्या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा नवाब मलिक यांनी समाचार घेतला आहे.
शरद पवार हे मुख्यमंत्री असताना फडणवीस कधी विधानसभेत सदस्य म्हणून निवडून आले नाहीत. कालपर्यंत ज्यांच्या राज्यात 25-30 जागा निवडून येत होत्या ते शरद पवार यांच्यावर भाष्य करत आहेत. याअगोदरही शरद पवारांवर फडणवीस भाष्य करत होते त्यावेळी काय झाले याची आठवणही नवाब मलिक यांनी फडणवीस यांना करुन दिली आहे.