मुंबई – ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा गंभीर बनला आहे. आरक्षणाशिवाय निवडणुका नको ही राज्य सरकारची भूमिका असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
पुढे मंत्री मलिक म्हणाले की, मात्र पाच जिल्ह्यांतील रिक्त जागांबाबत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी आज (13 सप्टेंबर) बैठक आयोजित केली असल्याचे मलिक यांनी सांगितले.
कायदा करुन आरक्षण देण्याचा प्रस्ताव सरकारसमोर आहे. तत्पूर्वी निवडणुका टाळता येत नसतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या पाच जिल्ह्यांतील रिक्त जागांवर ओबीसी उमेदवार देण्याची भूमिका आधीच जाहीर केली असल्याचे नवाब मलिक म्हणाले.