नवरात्रीच्या नऊ दिवसात अनेक महिला उपवास करतात. ऩऊ दिवसाचे निरंकाळ उपवास करतात तर कुणी घट बसवून घटस्थापनेचा किंवा अष्टमीचा उपवास करतात. मात्र याच काळात अनेक महिला अनवाणी पायाने ऩऊ दिवस चालतात. अनवाणी पायाने राहिल्याने उपवास श्रेष्ठ ठरतो, असंही म्हणतात. मात्र या मागचं नेमकं कारण काय? हे आपण जाणून घेणार आहोत…
धार्मिक कारण-
चपलेबरोबर मनाला चिकटलेले विकारही मंदिराच्या पायरीशी ठेवून मंदिरात प्रवेश न करणे, त्यामागचा मुख्य हेतू आहे. तसेच मंदिर परिसर घाण होऊ नये, ही देखील सद्भावना असते.
शास्त्रीय कारण-
-आपल्या पायाचे तळवे अतिशय संवेदनशील असतात. संपुर्ण देहाचे अँक्यूपंचर पॉईंट्स पायाच्या तळव्यात असतात.
-अनवाणी पायाने चालल्यामुळे जमिनीची विद्यूत शक्ती पायाच्या तळव्यातून
शरीरात शिरकाव करते.
-रक्त संक्रमण सुधारते. अनेक प्रकारच्या आजारातून मुक्तता मिळते.