मुंबई : औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून भाजपा-शिवसेना यांच्यात कलगीतुरा पाहायला मिळत आहे. एकीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून नामांतराला विरोध केला जात आहे. तर दुसरीकडे भाजपाने हाच मुद्दा उपस्थित करत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.अशातच आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी ठाकरे सरकावर जोरदार टीका केली आहे.
दरम्यान पत्रकारांशी बोलतांना नवनीत राणा म्हणाल्या की,’सध्या ठाकरे सरकारची अवस्था जावा आणि दिराच्या भांडणा सारखी झाली आहे. विचार जमतं नसताना शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष यांची युती झाली आहे. त्यामुळे विचार जमत नसेल तर तुम्ही एकमेकांना सोडाअसं म्हणत नवनीत राणा यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
दरम्यान, राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भाजपा आणि शिवसेना एकमेकांसमोर उभे राहिल्याचे दिसत आहे. भाजपाकडून होत असलेल्या आरोपांना शिवसेनेच्या नेत्यांसह सामनातूनही प्रत्युत्तर दिले जात असल्याचे दिसत आहे.