नवी दिल्ली: सोमवार पासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरवात झाली आहे. अधिवसेनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना खासदारांनी महाराष्ट्रातील परिस्थितीवरून संसदेत आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेनेच्या खासदारांनी घेतलेल्या या पावित्र्यावर अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी चांगलाच हल्लाबोल केला आहे.
महाराष्ट्रात निर्माण झालेल्या परिस्थितीवर भाष्य करत राणा म्हणाल्या कि जर शिवसेनेला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची एवढी काळजी आहे, तर मग राज्यात राष्ट्रपती राजवट का लागू दिली. शिवसेनेनं स्वतःच्या स्वार्थासाठीच युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. जर शेतकऱ्यांचं भलं व्हावं असं वाटत असेल तर राज्यात ओल्या दुष्काळाचे संकट असताना देखील सरकार स्थपन करण्यात सहकार्य का केलं नाही.
Delhi: Shiv Sena leaders hold protest near the statue of Chhatrapati Shivaji Maharaj in Parliament premises, demanding to declare unseasonal rains in Maharashtra as natural calamity pic.twitter.com/RvEHPOGMzl
— ANI (@ANI) November 18, 2019
दरम्यान महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करत शिवसेना खासदारांनी संसदेच्या बाहेर आंदोलन केले आहे. त्यामुळे राणा संसदेचं चांगल्याच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.