पुणे – मराठी चित्रपट निर्माते निलेश नवलाखा ह्यांनी काही दिवसांपुर्वी महामहीम राज्यपालांना पत्र लिहीले होते. ह्या पत्रात नवलाखा असे म्हटले की जशी आपण कंगना रानावात ह्यांच्या ऑफिसचे बेकायदेशीर बांधकामा वर मुंबई महापालिकेने केलेल्या अतिक्रमण च्या कारवाईत वैयक्तिक लक्ष घालून अभिनेत्री कंगना रानावत ह्यांना बोलवून घेऊन भेट दिली.
त्याच प्रमाणे मी सुद्धा मराठी चित्रपट निर्माता आहे व पुण्यात छोटासा बांधकाम व्यावसायिक देखील आहे, माझे पुणे महापालिकेच्या हद्दीत हडपसर येथे एक छोटासा प्रकल्प आहे, ह्या भागात बरीच बेकायदेशीर बांधकाम गेल्या ४-५ वर्षात झालेली आहे व तक्रारी करून सुद्धा त्याच्यावर काहीही कारवाई आजपर्यंत झाली नाही. अभिनेत्री कंगणा रानावत ह्यांचे बांधकाम बेकायदेशीर होते परंतु माझे बांधकाम कायदेशीर आहे. माझ्या सारख्या कायदेशीर मार्गाने व्यवसाय करणार्याला सरकार कडुन संरक्षण मिळावे व मराठी चित्रपट निर्मात्याला आपले म्हणणे मांडायची संधी मिळावी ह्या आशयाचे मुद्दे पत्रात मांडले होते.
ह्या पत्राची दखल घेऊन महामहीम राज्यपाल ह्यांनी चित्रपट निर्माते निलेश नवलाखा ह्यांना २२ सप्टेंबर ला सकाळी १२:३० वाजता भेटीचे निमंत्रण दिले आहे. ह्या संदर्भात नवलाखा असे म्हटले की ज्याप्रमाणे राज्यपाल ह्यांनी कंगना राणावत यांना सहह्रुदयता दाखवली तशीच त्यांनी मला भेटण्याची वेळ देऊन दाखवली आहे त्या बद्दल मी त्यांचा आभारी आहे.
ह्या वेळी मी व मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले कोविड मुळे अडचणीत आलेल्या आठ लाख कलाकारांच्या व्यथा माननीय राज्पाल ह्यांच्या समोर मांडणार आहोत. महामहीम राज्यपाल यांनी मराठी चित्रपट निर्मात्याला ला भेटीचे निमंत्रण दिल्यामुळे सर्व मराठी चित्रपट सृष्टी, कलाकार तंत्रज्ञ व एकुणच महाराष्ट्रात ल्या जनतेला चांगला संदेश जाईल असा विश्वास नवलाखा ह्यांनी व्यक्त केला.