रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास आठ दिवसांत लावणार टाळे
नगर – नगर-जामखेड, नगर-सोलापूर तसेच शहराला जोडणारे सर्व महामार्गांची दुरावस्था होऊन देखील त्याकडे डोळेझाक करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे गेट बंद करुन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सोमवार दि.4 नोव्हेंबर रोजी आंदोलन करण्यात आले.
या नगर, श्रीगोंदा विधानसभेचे अध्यक्ष गहिनीनाथ दरेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात राष्ट्रवादी विद्यार्थीचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र भांडवलकर, नगर तालुका कार्याध्यक्ष अशोक कोकाटे, अनिल नरवडे, सागर निंबाळकर, देविदास शेळके, प्रितेश दरेकर, रामेश्वर काळे, गणेश दरेकर, अनिल रोहोकले, अंकुश वामन, सोनू दरेकर, अविनाश वामन, महेंद्र वामन, सागर वाळुंज आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगर-जामखेड, नगर-सोलापूर रोडसह शहराला जोडणाऱ्या सर्वच महामार्गाची पावसाने दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठे-मोठे खड्डे पडल्याने वारंवार अपघात होत आहे. शहराला जोडणारे महामार्ग म्हणजे मृत्यूचे सापळे बनले असून, नागरिकांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. खड्डे व धुळीने माखलेले रस्त्यांमुळे नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. या गंभीर प्रश्नाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देत नसल्याच्या निषेधार्थ संबंधीत प्रशासनाला जागे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे गेट बंद करुन आंदोलन करण्यात आल्याचे राष्ट्रवादीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.