मुंबई – दिवसभर सुनावणी पार पडल्यानंतर आज सुप्रीम कोर्टाच्या बेंचने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याचे नाकारले आहे मात्र हा अंतिम निर्णय आहे असे वाटत नाही. आता निवडणूक आयोगाने दोन्ही बाजू ऐकून घेऊन निर्णय घ्यावा हे सुप्रीम कोर्टाला अपेक्षित आहे असे दिसते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
शिवसेना व शिंदे गटाबाबत आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर प्रदेशाध्यक्षांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. ते पुढे म्हणाले की, निवडणूक आयोग आपली कार्यवाही सुरू करेल, परंतु निवडणूक आयोग काय निर्णय घेतो यावर सर्व अवलंबून आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयाअगोदर बोलणे संयुक्तिक ठरणार नाही, असेही जयंत पाटील म्हणाले.