पुणे – राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक कांचन नायक यांचे आज पुण्यात निधन झाले. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी एक वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कांचन नायक यांच्या दोन चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. कळत नकळत आणि विश्वनाथ एक शिंपी या चित्रपटासाठी त्यांना पुरस्कार मिळाले होता. गेली साडेचार दशके ते दिग्दर्शनात कार्यरत कर्यरत होते. जब्बार पटेल, राजदत्त, प्रभाकर नायक, दिनकर डी पाटील यांच्यासोबतही काम केले. चित्रपट, माहितीपट आणि मालिकांसाठीही दिग्दर्शन केले आहे.