नाशिक : राज्यात कोसळत असलेल्या पावसाने अनेक ठिकाणी पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच मागील दोन दिवसांपासून नाशिक शहरात रात्रीपासून पावसाची संततधारेत वाढ झाली आहे. शहारात सकाळी 8 वाजेपर्यंत 80मिमी पाऊस पडला. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून खबरदारीचा उपाय म्हणून दर तासाला 3 हजार क्यूसेक इतका विसर्ग विसर्ग केला जात आहे.
#WATCH: Flooding in premises of Trimbakeshwar Temple in Nashik following incessant rainfall. #Maharashtra pic.twitter.com/e2RVbAOeFx
— ANI (@ANI) August 4, 2019
आज सकाळच्या आकडेवारीनुसार गंगापूर धरणातून सकाळी साडे 9 वाजता 23 हजार 445 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू गेला. तसेच होळकर पुलाखालून पाण्याचा विसर्ग हजार क्युसेकपेक्षा अधिक असून धोक्याची पातळीच्या अधिक वर गोदावरी वाहू लागली आहे. नारोशंकर मंदिरावरील घंटेपर्यंत पाणी पोहचले आहे. मंदिरचे संपूर्ण छत पुराच्या पाण्यात बुडाले आहे.