Narendra Modi : पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाच्या काळात अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी इंधनाचा सुज्ञपणे वापर करणे, सोन्याची खरेदी आणि परदेश प्रवास पुढे ढकलणे, यांसारख्या विविध उपायांचे आवाहन केले होते. पंतप्रधानांच्या या आवाहनावर विरोधी पक्षांकडून तीव्र टीका करण्यात आली आहे. त्यांनी या आवाहनाला धोरणात्मक अपयश असल्याचे म्हणत, सरकारवर अर्थव्यवस्था कमकुवत केल्याचा आरोप केला. ठाकरेसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आरोप केला की, काटकसरीची ही पावले म्हणजे केवळ निवडणुकांवर (Narendra Modi) लक्ष केंद्रित केलेल्या कारभाराचा परिणाम आहेत. तर, जनतेला उपभोग आणि प्रवासावर निर्बंध घालण्यापूर्वी भाजपने स्वतः आधी आदर्श घालून द्यावा, अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने केली. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, सामान्य नागरिक मात्र कष्टाचा आणि अडचणींचा भार सोसत असताना, पंतप्रधान मात्र कार्यक्रम, फोटोशूट्स आणि प्रचार सभा यामध्येच मग्न आहेत. देशाला इंधन आणि एलपीजीचा तुटवडा भेडसावत आहे आणि महागाईचा सामान्य जनतेवर गंभीर परिणाम झाला आहे. Narendra Modi देशाला एका दूरदृष्टी असलेल्या नेत्याची (Narendra Modi) गरज होती, परंतु त्याऐवजी देशाला केवळ एका इव्हेंट मॅनेजरचा भार सोसावा लागत आहे, असे सपकाळ यांनी सोशल मिडियावरती म्हटले. निवडणुकीतील विजयाच्या हव्यासापोटी मोदी सरकारने अर्थव्यवस्था कमकुवत केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, आता मात्र नागरिकांना पेट्रोल, डिझेल, खते आणि खाद्यतेलाचा वापर कमी करून त्याग करण्यास सांगितले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. इतर देश संभाव्य जागतिक संकटांचा सामना करण्यासाठी तयारी करत असताना (Narendra Modi) भाजप मात्र निवडणुका, जाहिराती आणि द्वेषाच्या राजकारणावर लक्ष केंद्रित करत असल्याचे त्यांनी म्हटले.