मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कार्यमुक्त करण्याची विनंती केली आहे. यात त्यांनी ‘उर्वरित काळ अध्ययन, मनन आणि चिंतनात व्यतील करु इच्छितो. त्यामुळे आपल्याला जबाबदारीतून मुक्त करावे, असे म्हटले आहे. त्यांच्या या राजीनाम्यावरून आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. तसेच आता त्यांच्या जागी महाराष्ट्राला कोणते नवे राज्यपाल मिळणार, अशी चर्चा सुरु आहे.
या संदर्भात संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे,’नियम आणि कायद्यानुसार, एखाद्या राज्याचा नागरिक, त्याच राज्याचा राज्यपाल होऊ शकत नाही. या देशात आणि राज्यात अनेक गोष्टी घटनाबाह्य होत असतात, असं काही घटनाबाह्य कृत्य केलं असेल तर आम्ही त्या नावाचं स्वागत करू, मजा येईल..’ असं म्हणत राऊत नाव न घेता राणेंना टोला लगावला आहे,
दरम्यान,केंद्रीय मंत्री नारायण राणे राज्यपाल होण्याची शक्यता आहे. अर्थात नारायण राणे महाराष्ट्रात नव्हे तर दुसऱ्या राज्याचे राज्यपाल होऊ शकतात. पण राणेंच्या राज्यपाल पदावरून संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.