सिंधुदुर्ग – केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर जन आशीर्वाद यात्रेदरम्यान जोरदार हल्ला चढवला आहे. महाराष्ट्रात सरकार आहे की नाही हे मला कळत नाही, कुठेतरी चार टकले येतात, झेंडा दाखवतात आणि पळून जातात ही शिवसेनेची अवस्था आहे. अशी टीका राणे यांनी कणकवल येथे जन आशीर्वाद यात्रेतील भाषणात केली आहे.
नारायण राणे म्हणाले की, ‘आमच्या सभेसाठी प्रचंड मोठा ताफा आहे. सात ते आठ हजार लोक रस्त्यावर आहेत. शिवसेनेच्या कार्यालयासमोर जिल्ह्यातील ५३ माणसं आहेत. ही शिवसेनेची अवस्था आहे. आमच्या विरोधात काही चालणार नाही, आधी चांगला कारभार चालवा. जन आशीर्वाद यात्रेला आल्यापासून मी पाहतोय किती हार, किती गुच्छ. ते हार आणि गुच्छ माझ्या आयुष्यात महत्त्वाचे आहेत. पैसे सगळेच मिळवतात पण मी हाराची किंमत पैशात करत नाही.’