मुंबई – सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने भाजप आमदार नितेश राणेंचा नियमित जामीन अर्ज फेटाळला आहे. नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी झाली होती. सत्र न्यायालयाने आज यावर निकाल दिला. त्यानंतर शिवसेनेने राणे कुटुंबाला टोला लगावला.
न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर कोर्टाबाहेर नितेश राणेंची गाडी अडवण्यावरुन निलेश राणे आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
खासदार राऊत म्हणाले की, “पोलिसांबरोबर हुज्जत घालण्यापेक्षा अशा प्रकारचे काम केले नसते तर बरे झाले असते. निलेश राणेंचे नाटक नेहमीचेच असून मला त्यावर काही बालायचं नाही. पोलीस योग्य भूमिका घेऊन आवश्यक ते काम करतील. मात्र आता खऱ्या अर्थाने केंद्रीयमंत्री नारायण राणेंना देशातला कायदा नेमका काय आहे, ते कळलं असेल.
जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यामुळे नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. दरम्यान, सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात नितेश राणे जिल्हा न्यायालयात दाद मागणार आहेत.