नंदीता दास यांची जयपूर संमेलनात भूमिका
जयपूर : भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. पण पहिल्यांदाच येथे नागरिकांना त्यांची ओळख त्यांच्या धर्मावरून विचारली जात आहे. त्यामुळेच का आणि एनआरसी विरोधात नागरिकांनी आवाज उठवायला हवा, असे मत बॉलीवूड अभिनेत्री आणि दिग्दर्शक नंदिता दास यांनी केले. जययपूर येथील साहित्य महोत्सवात त्यांची मुलखात घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
आज देश अनेक आव्हानांना सामोरे जात आहे. बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अर्थव्यवस्थेचे स्वरूप नाजूक आहे. आपल्या देशात अर्थव्यवस्था रसातळाला जात आहे. बेरोजगारी वाढली आहे. शिक्षण आणि अरोग्य सेवेचे आव्हान आहे आणि तुम्ही लोकांना ते भारतीय असल्याचे सिध्द करायला सांगता? असे दास म्हणाल्या.
गेल्या चार पिढ्या येथे राहणाऱ्या नागरिकांना तुम्ही सांगणार असाल की हा देश तुमचा नाही? तर ते खूप अस्वस्थ करणारे आहे. मला वाटते प्रत्येकाने या विरोधात बोलले पाहिजे. सगळीकडे उत्स्फूर्त निदर्शने केली जात आहेत. आता प्रत्येक ठिकाणी शाहीनबाग घडत आहे. किती लोक रस्त्यावर उतरत आहेत त्यामुळे मला वाटते लोकांनी या विरोधात बोलले पाहीजे. आपल्या देशाचा पाया आणि मुल्ये कायम ठेवली पाहिजेत.
मात्र अनुपम खेर आणि नसरूद्दिन शहा यांच्या वादावर भाष्य करण्यास दास यांनी नकार दिला. एनआरसी आणि नागरीकत्व कायद्यातील संबंधाचे वर्णन नंदिता दास यांनी धोकादायक असे केले.