नागपूर – राज्यातील सहा विधानपरिषद जागांसाठीच्या निवडणुकीपैकी चार ठिकाणी निवडणूक बिनविरोध झाली. मात्र, नागपूर आणि अकोला या ठिकाणी एकमत होऊ न शकल्यामुळे तिथे निवडणूक झाली. या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपा आणि सत्ताधारी महाविकासआघाडी यांच्यात चुरशीचा सामना पाहायला मिळाला. या निवडणुकीत भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचा दणदणीत पराभव करत विजय मिळवला आहे. यावर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नाना पटोले म्हणाले की, घोडेबाजार करून हा विजय मिळविला आहे. घोडेबाजार होणे हे लोकशाहीसाठी घातक आहे. स्वतःचे मतदार त्यांनी बाहेर नेले. त्यांचा आपल्या मतदारांवर विश्वास नव्हता. त्यामुळेच पर्यटनावारी करावी लागली. असाे. जाे निकाल आला त्याचे स्वागतच करायला पाहिजे. दरम्यान उमेदवार बदलल्याने आम्हांला काही फरक पडला नाही असेही पटोले म्हणाले आहेत. ते नागपूर येथे बोलत होते.