मुंबई – मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावे आणि कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठासह राज्यातील सर्वच सार्वजनिक स्थळांचे नाव हे ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असे करण्याची मागणी भाजपा खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे.
खासदार संभाजीराजेंनी उद्धव ठाकरेंना पात्र लिहीत त्यांचे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. तसेच पत्रात लिहले आहे कि, महाराष्ट्रातील जनमानसात छत्रपती शिवाजी महाराजांचे किती मोठे स्थान आहे हे आपणांस माहितच आहे. काही दिवसांपासून महाराजांच्या नाम उच्चारावरुन मोठी चर्चा होत आहे. मग ते अमिताभ बच्चन प्रकरण असो वा केंद्रीय रवीशंकर प्रसाद यांचे, त्या दोन्ही वेळी शिवभक्तांची बाजू घेत जाब विचारला होता. मात्र यावर कायमस्वरुपी उपाय योजना करणे आवश्यक आहे. सुरुवात म्हणून सार्वजनिक स्थळांचा नामविस्तार करणे आवश्यक आहे. तसेच नावांमधील एकेरी उल्लेख टाळण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या आहेत.
मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेणे आणि कोल्हापुरातील ‘शिवाजी विद्यापीठासाहित’ महाराष्ट्रातील सर्वच सार्वजनिक स्थळांचे नामकरण हे ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असे करणे (उदा. ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, कोल्हापूर) बाबत मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली आहे. pic.twitter.com/4N0ClxDFwg
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) December 4, 2019
याव्यतिरिक्त मराठा आरक्षणादरम्यान दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. त्यांच्याव्यतिरिक्त आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार धनंजय मुंडे यांनी मराठा आंदोलनादरम्यान आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची विनंती केली आहे