नागपूर – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानावरून चांगलेच वादंग निर्माण झाले आहे. नागपूर येथे आजपासून हिवाळी अधिवेशन चालू होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजप आमदारांनी ‘मी पण सावरकर’ असलेल्या टोप्या घालून विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी केली. राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणीही भाजपाने यावेळी केली.
दरम्यान, नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आपल्या पहिल्या परिक्षेला सामोरे जाणार आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला परंपरेनुसार घेण्यात आलेल्या विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस आघाडी सरकारवर टिकेची झोड उठवली.