नगर – शहराचे प्रथम महापौर भगवानराव फुलसौंदर यांचे आध्यात्मिक कुटुंब आहे. शिवसेनेच्या माध्यामतून त्यांनी महापौर पदाची जबाबदारी सांभाळली. एखाद्याची राजकीय तपस्या संपविण्याचे कुटील राजकारण या माध्यमातून पुन्हा समोर आले असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केला आहे.
संभाजी कदम म्हणाले की, या प्रकरणात निश्चित राजकारण आलेले आहे. बुरुडगाव भागात काही टोळ्या सक्रीय आहेत. या टोळ्या तेथील नागरिक, प्लॉटधारक, बंगले धारकांना, व्यापाऱ्यांना बांधकाम करण्यापासून त्रास देतात.