Nagar Corona Update (प्रतिनिधी) – जिल्ह्यात आज 829 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 87 हजार 819 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 91.25 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्ह्यात रुग्ण संख्येत 1 हजार 319 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या 7 हजार 200 इतकी झाली आहे. तसेच आज चौघाचा करोनाने मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीत समोर आले आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 447, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 400 आणि अँटिजेन चाचणीत 472 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 188, अकोले 36, जामखेड 29, कर्जत 5, नगर ग्रामीण 26, नेवासे 11, पारनेर 17, पाथर्डी 23, राहता 2, संगमनेर 48, शेवगाव 9, श्रीगोंदा 7, श्रीरामपूर 20, कॅन्टोन्मेंट बोर्ड 23, मिलिटरी हॉस्पिटल 2 आणि इतर जिल्हा 1, अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 137, अकोले 1, जामखेड 3, कर्जत 3, कोपरगाव 44, नगर ग्रामीण 12, नेवासे 14, पारनेर 7, पाथर्डी 8, राहाता 51, राहुरी 22, संगमनेर 10, शेवगाव 13, श्रीगोंदा 10, श्रीरामपूर 44, कँन्टोन्मेंट 6, इतर जिल्हा 14 आणि इतर राज्य 1, अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजेन चाचणीत आज 472 जण बाधित आढळून आले. मनपा 37, अकोले 26, कर्जत 42, कोपरगाव 100, नगर ग्रामीण 20, नेवासे 75, पारनेर 4, पाथर्डी 34, राहाता 10, राहुरी 29, संगमनेर 6, शेवगाव 31, श्रीगोंदा 17, श्रीरामपूर 27, कॅन्टोन्मेंट बोर्ड 10 आणि इतर जिल्हा 4 अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 239, अकोले 27, जामखेड 4, कर्जत 32, कोपरगाव 89, नगर ग्रामीण 74, नेवासे 52, पारनेर 48, पाथर्डी 29, राहाता 81, राहुरी 30, संगमनेर 37, शेवगाव 2, श्रीगोंदा 10, श्रीरामपूर 55, कॅन्टोन्मेंट 9 आणि इतर जिल्हा 11, अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्णसंख्या:87819
उपचार सुरू असलेले रुग्ण:7200
मृत्यू:1222
एकूण रुग्णसंख्या:96241
दुकानदार, भाजीपाला, फळविक्रेत्यांना करोना निगेटिव्ह रिपोर्ट सक्तीचा
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भिंगार कॅन्टोन्मेट बोर्डाने फतवा काढत दुकानदार, भाजीपाला, फळ विक्रेत्यांना करोना निगेटिव्ह रिपोर्ट सक्तीचा केला आहे. हा रिपोर्ट नसल्यास दुकाने सील करण्यासोबत पाच हजारांचा दंड करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक ठिकांनी करोना नियमांची पायमल्ली होत असल्याने कॅन्टोन्मेट बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. तसेच कॅन्टोन्मेट बोर्डाच्या हॉस्पिटल मध्ये करोना चाचण्यांची सोय करण्यात आली आहे. भाजीपाला, फळ विक्रेते, दुकानदारांनी करोना चाचणी करावी असे सांगण्यात आले आहे.
15 दिवसात दीड लाखांचा दंड
शहरात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपाच्यावतीने शहरात चार दक्षाता पथके तैनात करण्यात आली आहे. या पथकाच्या वतीने शहरातील चौका चौकात विनामास्क फिरणार्यांवर कारवाई करण्यात येत आहे. गेल्या 15 दिवसात या पथकाने तब्बल 1 लाख 55 हजारांचा दंड वसूल केला आहे. तसेच अनखी चार पथके मनपाच्या वतीने तैनात करण्यात येणार आहे.