नवी दिल्ली – उत्सवाच्या काळात देशात कांद्याच्या किमती वाढू नयेत याकरिता नाफेडने 20 हजार टन कांदा विविध राज्यात खुला केला आहे. अचानक देशात कांद्याच्या किमती वाढू नयेत याकरिता केंद्र सरकारने कांद्याचा राखीव साठा करून ठेवला आहे. त्यातील 20 हजार टन कांदा गेल्या तीन आठवड्यात विविध राज्यांना देण्यात आला.
दिल्ली, पाटणा, लखनऊ, चंदीगड, चेन्नई या शहरासह इतर शहरांना हा कांदा देण्यात आला आहे. देशात साधारणपणे ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान कांद्याच्या किमती वाढतात. या काळामध्ये कांदा पुरवता यावा याकरिता केंद्र सरकारच्या वतीने नाफेडने अडीच लाख टन कांद्याची खरेदी करून ठेवली आहे. त्यापैकी 20 हजार टन कांदा अगोदरच खुला करण्यात आला आहे.
एप्रिल आणि मे महिन्यामध्ये नाफेडने जो कांदा खरेदी केला आहे. तो कांदा सध्याच्या बाजारभावाने राज्यांना पुरविण्यात येत आहे. सध्या उत्तर- पूर्वेत कांद्याचे दर 40 रुपये प्रति किलो आहेत. तर इतर भागांमध्ये कांद्याचा दर 23 ते 25 रुपये प्रति किलो आहे.